संध्या पडियार

हे कसले भास् आभास

हे कसले भास आभास
 
प्रत्येक गोष्टीत फक्त अन्नाचा वास
 
समोर वाढलेल्या फुलक्यात सुधा
 
खमंग थालीपिठाचा भास
 
डाइयेटिंग सुरू केल्यावर
 
दुसरा नाही टाइम पास
 
कॅलरीसची गणित मांडताना
 
फक्त वजन कमी करण्याचा ध्यास
 
वजन कमी होण्यासाठी सोडल
 
तेल, तूप आणि मास
 
कितीही व्यायाम केला तरी
 
या कठोर परीक्षेत झाली नापास
 
किती तरी प्रयत्न केले
 
बारीक होण्यासाठी खास
 
आणि वजन वाढल असल तरी
 
होतो बारीक झाल्याचा भास
 
 
 

तू जवळ असल्याचा भास

खुपदा तू दूर असून
 
जवळ असल्याचा भास होतो
 
भास झाल्याचा कळल्यावर
 
जीवास खूप त्रास होत
 
वेड्या क्षणी भास होतो
 
तू जवळ असल्याचा
 
डोळे उगाच दावा करतात
 
तू स्पष्ट दिसल्याचा
 
 

घर असावे घरसारखे

घरामधे वावरताना मीपणा टाकायचा असतो
 
मी मी करून कुणी मोठा होत नसतो
 
आपल्यापूर्ती पाहून आपलीच माणसे दूर जातात
 
काळीज असणार्‍या माणसालाच फक्त वेदना होतात
 
माझ माझ म्हटल की घर काही माझा होत नस्त
 
दुसर्‍याला नीन्द्ल्यन आपल्याला कुणी वंदत नस्त
 
घरासाठी केलेल्या कामाचा पाढा वाचायचा नसतो
 
कारण तो ऐकण्यासाठी जवळ कुणीच उभा नसतो
 
करून सावरून सर्व काही विसरायचे असते
 
नाही तर मग जीवनाचीच गोळा-बेरीज चुकते
 
घरात वावरताना दुसर्‍याच्या सुखात सुख पाहायचे असते
 
आणि दुसर्यांचा दुखात आपले दुख विसरायचे असते
 
घरा मधे वेगळे घर करून राहायचे नसते
 
कारण माझ माझ म्हटल की घर काही माझा होत नस्त
 
दुसर्‍याला निन्द्ल्यन आपल्याला कुणी वंदत नस्त
 
 

तुझ्याकड़े सारे सारे

तुझ्याकडे सारे सारे
 
माझ्याकडे काहीच नाही
 
तुझ्याच कडे माझा जीव
 
माझ्याकडे काहीच नाही
 
तू दिसावा म्हणून उन्हतुन तळमळते
 
तुझा एक भास सुधा दिवस भर पुरते
 
तुझ्या कडे सारे सारे
 
माझ्याकडे काहीच नाही
 
तुझ्याचकडे माझा जीव
 
माझ्याकडे काहीच नाही

चारोळ्या - माझ्या मनातल्या

सत्याचा शोध कसा घ्यावा

बाह्य स्वरुपावर विसंबून न राहता

कुणाच्याही अंतरंगात शिरू शकलात

तर त्याचा शोध तुम्ही घेऊ शकता
------------------------------------
आपल्या बरोबरच आपला चहरा

मानुस जन्मातः घेउन येतो

म्हनुनच लाखातून आपला माणूस

आपण बरोबर ओळखू शकतो

-------------------------------------
वाहीच कोर पान वाट बघतय

आपल्यावर काय लिहल जाणार

कष्ट सहन करीत जन्माला आलोय

मिळालेया जन्माच सार्थक होणार???

-----------------------------------------

चंडोलपक्षी म्हणे गाताना

स्वतःला जख्म करूँ घेतो

त्याच्या सारखा सुन्दर आवाज

सांगा कुणाला काढता येतो???

------------------------------------------
मान मागुन मिळत नसतो

मागुन मिळालेला मान नसतो

मान इतरानी द्यायचा असतो

आणि ताठ मानेनी तो घ्यायचा असतो

---------------------------------------------

डोळ्यानी साक्ष दिली नाही

तर कानांवर कसा विश्वास ठेवायचा

डोळे नि कान आपले असले तरी

डोलायमान होतो तराजू मनाचा

----------------------------------------------

माणसाला नरदेह लाभलाय

गेल्या जन्माची पुण्याई म्हणुन

पुढला जन्मा ही नरदेह हवातर

ह्या जन्मी ठेवा पुण्य साठवून

---------------------------------------

स्वताची आणि हक्काची अशी

सावली स्तेच प्रत्येकाला

अप्पाल्पोटा झालेला माणूस

कुठे देतो ती दुसर्‍याला

-----------------------------------------

नातू म्हणे आजोबा

वृधाश्रामत कोण जाते

आजोबा म्हणे जुन्या वस्तुंची

जेव्हा घरात अड़चन होते

----------------------------------------

 

 
 

का सुचतात ह्या कविता

का सुचतात ह्या कविता

पाठवलेल्या ओळी कठीण असताना

तरीही तुझ्या दुखद आठवणी लिहाव्या वाटतात

तू हे शब्द वाचणार नसताना

आला पाऊस पहिला ह्या ओळिंवर शब्द लिहताना

ही नज़र तुलाच शोधायची

तू जवळ नसताना

माझी मीच हरवली होते

तू सोबत असताना

माझ्या मैत्रिणिना टाळत होते

तुझ्याशी नात जोडताना

पाण्यप्रमाणे वाहत गेले

तुझ्या मागे मागे फिरताना

तुझी स्वप्न रंगवत राहिले

तुला माझी कदर नसताना

तुझीच वाट बघत राहिले

तू नाही येणार हे माहीत असताना

तू सतत दुसर्यांचा आधार शोधत राहिला

मी जवळ असताना

काहीच कसा वाटला नाही रे तुला

माझ्याशी असा परक्यासारखा वागताना

जीवनात येणार्‍या प्रत्येक सुख-दुखाच्या वळणावर

तुझीच कमी वाटत राहिल

सर्व जवळ असताना

अनेक प्रश्न पडतात मनात

तुझाच विचार करताना

माझेच काही चुकले का रे

तुला माझे प्रेम समजावताना...