ग्रिष्माच्या काही कविता ...कवी ग्रिष्म गुंजाळ

 ********************************************************

 बाबा
बाबा खर सांग तू माझ्या आवडीसाठी..
तुझ्या किती आवडी सोडल्या ..
माझ्या सुखासाठी तुझ्या न सुटना-या सवई मोडल्या ?
माझ्या एका सहलीच्या पैश्यासाठी..
रिक्शा सोडून बस ने गेलास कामाला ..
घेत होता नवे कपडे मला
अन स्वत : तीच पैंट फाटेपर्यंत घालायचा .
खर सांगशील तुझा जमाखर्च कसा रे भागवायचा ?
जमवलिस कवडी कवडी ..
दिलीस मला भेल अन रेवडी...
बाबा मी मोठा होत गेलो
अन तू म्हातारा
मला येत गेली अक्कल
अन तुला पडल टक्कल
विसरलास कधी माझ्या साठी होत होता घोड़ा
आता मलाच सांगत असतो झालास न घोडा .
हे तुझ माझ अस वेगळ होत नात
खर सांगशील माझ्या सुखासाठी
आईलाही तू कधी दिला नाही गजरा
पण माझ्या पु-या केल्या गरजा
बाबा आता मी झालोय मोठा
तुझ्या सुखाला नाही राहणार तोटा
तुझ्यासाठी आता इथून पुढे झिजेल
तुझ अपुर स्वप्न पूर्ण होताना दिसेल
तू फ़क्त एक काम कर
आता कामावर जायच तेव्हढ बंद कर
घरी बसून आता आराम कर '
खुप दिवस आईशी निवांत बोलला नसेल
तिला घेउन लाम्ब जायचा एखादा प्लान कर
बाबा आता मी मोठा झालो

********************************************************

उद्या कदाचित.....
स्फोटात फाटलेले डबे
बदलले जातील उद्या कदाचित.....
रक्ताचे ते थेंब...
मासांचे ते तुकडे ....
अन घाबरलेले ते रुळ
बदलले जटिल उद्या कदाचित ...
मानसं कोम्बुनं घेतील स्वताला
पुन्हा त्याच डब्यात उद्या कदाचित ...
दारावर सुरु असेल मारामारी
आत चिंता चौथ्या सिट साठी ...उद्या कदाचित
पुन्हा दादर महिम जोगेश्वरी
बोरीवली अन मिरारोड़सगळी स्टेशन
पुन्हा उभी असतील रांगेत उद्या कदाचित ....
पुन्हा त्याच डब्यात त्याच बोम्ब स्फोटावर चर्चा होतील
उद्या कदाचित
सगळ विसरून मानस पुन्हा
तसच जगतील जीवन उद्या कदाचित...
पुन्हा ११ जुलाई चा तोच दिवस
दारावर चालू असेल आत जाण्यासाठी मारामारी
आत कुणाची नजर चौथ्या सिट वर
गाड्या मात्र धावत असतील जिव घेउन मुठीत
पुन्हा ती वेळ टाळण्यासाठी उद्या कदाचित ...
  

********************************************************

 

काही माणस

काही माणस जगत असतात मरणाच्या आशेने,
थोडेच असतात वेडे जे चालत जातात सरळ मरणाच्या दिशेने.

दगडाला वेदना टाकिचे घाव सोसतांना,
त्या मूर्तीला यातना ह्या बडव्याना पोसताना.

अहो वर्दिला दुखः नको त्याना सलामी,
बंदुकी ढाळतात अश्रु नशिबी दहशतवादाची गुलामी.

माइकचा कंठ दाटे भ्रष्ट मंत्री खोकताना,
लाउड स्पिकराचा जीव जाई खोट्या घोषणा ओकताना.

गेंड्यालाही शरम वाटे ह्यांची जाड कातडी बघताना,
डासही मुकतात जिवाला रक्त्त यांचे शोषताना.

खादीला लाज वाटे ह्या नंग्याना झाकताना,
खाकीचा उर फाटे त्या दंग्याना थोपताना.

तिरंग्याचा घुतातो प्राण पार्थिव त्यांच झाकताना.
स्मशानाला नकोसा जीव प्रेतांचा दुख: सोसताना.
********************************************************
अर्धी रात्र
रात्र चांगली अर्धी सरून गेल्यावर
मी एक कटिंग (पण )पटियाला पेग सारखी भरून घेतो
तू फोडलेला एश ट्रे समोर आ वासून उभा
तेंव्हा त्याच्या तोंडी एक सिगारेट देतो
सुरु होतो मग एक घोट एक झुरका ...
खिडकीच्या फुटलेल्या काचेतून मग आभळाला हात जातो.
सिगारेट च्या धुरांच्या ढगात मग पावसाचा शोध होतो
हळु हळु मग पेला गरीब
अन एश ट्रे श्रीमंत होत जातो
मग तुझ्या आठवनीचा खेळ सुरु होतो
सिगारेट चे गरम श्वास धुरातुंन मग सर्वत्र तुझे चित्र रेखाटतात ..
त्यातून सुटलेले क्षण मग कागदाला चिकटतात .
पेल्यातली की सरना-या रात्रीची पण डोक्यात शिरत जाते एक नशा
मिळत जाते मग एक प्रवासाला वेगळिच दिशा ......
हळु हळु मग एक एक करून तुझी आठवण सतावत जाते
अन मग रात्रच सोबत जागत जाते
हळु हळु मनातल सार कागदावर उतरत जाते
आणि मनात तुझी आठवण जागत येते
..इतक्यात दारावर एक थाप पड़ते
अन मग माझी धांदल उड़ते
एश ट्रे लपवायचा कुठे ?
थोड्या वेळात त्याला लपउन
मी दार हळूच उघडतो तू दाराशी उभी
तुला मी आत घेतो ...
घरात साचलेला धुर बघून तू काही विचारणार
इतक्यात मी कछवा मछर अगरबत्तिच नाव घेतो .
टेबलावरचा ग्लास नाकापाशी नेत मी प्यायलो काय ?
याचा तू अंदाज घेत मला जवळ घेते
केसात हात फिरवत माझ गीत गात रहाते.
...इतक्यात शेजारच आलार्म च घड्याळ सकाळ झाल्याच केकाटत जाते
मी आपला डोळे चोळत उठतो
बघतो तर पेन कानाला टेबलावर ग्लास तस्साच
दाराला कड़ी आतून तशीच ...
मी सोफ्यावर एकटाच ..फ़क्त एश ट्रे तिथून गायब
मी त्याचा शोध घेतो ..तुझे एक अजुन स्वप्न समोरच्या कागदावर
त्याला फाइल लाउन देतो .
सकाळी माझी हालत बघून आरसा मला हसत राहतो ....
फाइल मला विचारत रहाते कधी येणार माझी सखी ???
********************************************************
राजे तुम्ही रक्त सांडले स्वराज्यासाठी...
 
राजे तुम्ही रक्त सांडले स्वराज्यासाठी...
आम्ही आज तुमचे किल्ले बघतो केवल मजेसाठी ...
तुमच्या मावळ्यानि कड़े चढले तुमच्या स्वप्नासाठी ...
आम्ही आड़वाटे नेही थकून जातो किल्ल्यावर जाण्यासाठी ...
तुमच्या सिंहाचे स्मारके आज युवकांचे दारूचे अड्डे ....
सिंहगडाच्या पायथ्याशी रेव पार्ट्याचे सडे...
मराठ्याच्या स्मराकांची हे हाल आता बघवत नाही ..
मराठा असल्याचे किल्यावर गेल्यावर बोलवत नाही ...
आमची मक्का मदीना आज धुळी खाली गदली जात आहे ..
कधी राज्य कर्त्यावर आज आरक्षण मागण्याची वेळ लादली जात आहे ..
राज गड पासून ते राय गडा पर्यंत च्या आजही शोधाव्या लागतात वाटा..
हया देशात राजे तुम्ही होतात म्हणुन आज होऊ शकले बिरला अन टाटा ...
शिर्डीच्या बाबाना सोंन्याचे सिंहासन अन छत्रपतीच्या समाधीला उन्हाच्या झळा...
मराठ्याचे मंत्री अन राजकर्ते शिव जयंतीला निधी करोडोचा करतात गोळा..
राज्याच्या नावावर आज निघतात कित्तेक सेना ...
अन मराठी लोकांसाठी लढना-याचा नावावर दाखल होतो गुन्हा ...
राजे बार झाले तुम्ही लवकर गेले
नाहीतर हे दुखः तुम्हास सहन नसते झाले ..
तुमच्या नावासाठी लढताना मेले ते तुमचे मावळे ..
आज तुमच्या नावावर करतात राजकारण
अन भरतात आपली घरे ते आमचे डोम कवळे...
नशीब राजे गड तुम्ही डोंगरावर बांधले
जर असते कधी जमिनीवर तर त्याचे सात बारा ह्यानी नक्कीच बदलले गेले असते...
कवी ग्रीष्म करतो सगळ्याना एक विनंती
रखा पावित्र्य गडाचे आज नाहीतर शोधावे लागतील पुरावे आमच्या इतिहासाचे 
******************************************************** 

सार काही तेच मग नवं काय ?

तोच पाउस
त्याच धारा
पुन्हा नव्याने
जुनाचा वारा...
पुन्हा एक नवी आठवण
पण जुन्याच मनात
फक्त नव्याने साठवण
तोच चिखल
तीच दलदल
अन तीच खडखड
तिची ती नेहमीची
तीच बडबड...
तेच रस्ते तेच खड्डे
फ़क्त नाव काय?
जुन्या खड्ड्यात
बेडकांचे नवे अड्डे

सार काही तेच मग नवं काय ?
तीच धरण फक्त नवे बंधारे
तीच नदी तेच नाले
तेच शेते तेच मळे
नदीला पुर आलेला
अन गावकुसाचे मात्र कोरडे तळे
तसच रात्री सुटलेले धरणाचे
नव्याने जुनेच पाणी
नव्या लोकांची तशीच जुनी धावपळ..
त्याच मदतीसाठी मारलेल्या
जुन्याच पण नव्याने आरोळ्या ....
दुसा-या दिवशीच्या पेपरातल्या बातम्या त्याच
फक्त नव्या चारोळ्या ....
नवा पुर नवी पाहणी
जुन्याच व्यथा फक्त नव्याने गा-हानी
नवी कमिटी नवी समिति
सार काही तेच मग नाव काय ?
नवी कमिटी नवा आदेश
पुन्हा नव्याने जुन्याच घोषणा
पाण्यात बुडून मेलेल्याच्या अतृप्त तृष्णा
तोच पाउस तोच वारा
पुन्हा नव्याने जुन्याच धारा ......
********************************************************

 ये अशी तू सजनी
 
ये अशी तू सजनी
रात्र थोडी सरल्यावर,
नभी तारका क्षितिजा वरच्या
थोड्या मागे उराल्यावर .
सावरग पदर तुझा
तो वा-यावर झुलतो आहे .
सावकाश तू चाल हरिणी
पायी काळोख तुझ्या ग फुल्लातो आहे .
पदराला सावरीत ये
पावलांना आवरीत ये .
आत्ताच झोपलेत वेडे तुझे...
स्वप्न तयान्न्चे खुलवित ये .
अबोलिच्या माझ्या फुलाना फुलवित ये .
थांब थोडी माघारी जाण्याची नकोस करू तू घाई
खट्याळ असे हां चंचल वारा ह्याला थोड थकू दे
नभीच चांदन थोड अजुन जरासं झुकू दे
रात्र सारी बाकी अजून
तिला थोडी तुझ्यासोबत सरू दे
नक्षत्राना तुझ्या माझ्या ह्या घेउन
तुझ्या कुशीत मला थोड शिरू दे
ये अशी तू रात्र थोड़ी सरल्यावर
तुझ्या अंगनात काळोख थोडा भरल्यावर
ये अशी तू सजनी
नभी तारका क्षितीजावर च्या मागे थोड्या उरल्यावर
थांब थोडी थोड तांबड फुटू दे
धुकं थोड कळ्याना खेटू दे'
उगवतिला जरा प्रकाशन भरू दे
अन तुला काळजात उद्या पुरत उरु दे
ये अशी तू सजनी रात्र थोडी सरल्यावर
नभी तारका माघे थोड्या उरल्यावर
********************************************************

********************************************************
अरे पावसा असा पडू नको दिवसा
२०-२० क्रिकेट सामन्यात पाउस पडताना आपले कृषि मंत्री तेथे पावसाला म्हणतात
शेती मंत्री :-
पावसा पावसा असा पडू नको दिवसा ...२
म्हणे माझ्या पोरांना २०-२० क्रिकेट थोड खेळु दे .
आणि माझ्या बीसीसीआई चा गल्ला थोडा अजुन भारू दे ..
तेंव्हा अरे पावसा असा पडू नको दिवसा .
पाउस :- कृषि मंत्र्याला
अरे अरे मंत्र्या माझ्या तोंड सुकलेल्या संत्र्या.....
मी जर पडलोच नाही तर
बळीराजा इथला रडेल रे .
मग तुझाच पाटबंधारे मंत्री शिव्या मला घालून
इथे कृत्रिम पावसा साठी प्रयोग करेल रे
अन मीच लोकांसाठी वाईट ठरेल रे..
तेंव्हा माझ मला पडू दे
तुझी क्रिकेट मैच राहिली तरी रहू दे
तो सचिन सेंचुरी नेहमीच करतो
बळी राजाचा बळी जायला नको
अन त्याचा कर्जाचा हप्ता चुकायला नको.
....
कृषि मंत्री :
अरे अरे पावसा असा पडू नको दिवसा ..
बळी राजाचा कर्जाचा हप्ता थकलाच नाही
दुष्काळ जर पडलाच नाही तर
बैंक कर्ज कोणाला देणार
आमचा सावकार कोणाच्या जिवावर जगणार
इथे कुणी आत्महत्या जर केलीच नाही
तर पेपर अन संसदेत आम्ही कशावर बोलणार ....
कुणाच्या कर्ज माफिवर आमच्या बैंकाची देनी आम्ही फेडनार
तेंव्हा तू आपला पडू नको
......
पावसा पावसा असा पडू नको दिवसा ...२
म्हणे माझ्या पोरांना २०-२० क्रिकेट थोड खेळु दे .
आणि माझ्या बीसीसीआई चा गल्ला थोडा अजुन भारू दे ..
तेंव्हा अरे पावसा असा पडू नको दिवसा .
********************************************************
पहचाना क्या बगुवा हमको दारात आला कोणी
पहचाना क्या बगुवा हमको दारात आला कोणी.
कपडे होते कर्दमलेले, डोळ्यामध्ये पाणी,

क्षणभर बसला, नंतर हसला बोलला वरती पाहून,
राज ठाकरेची मराठी पोर गेली स्टॉलवर येऊन.

गणपतीच्या मिरवणुकीसारखी नाच नाच नाचली.
मोकळ्या हाती जातील कशी,माझी बायको मात्र वाचली.

गाडी फुटली, चूल विझली, होत नव्हत गेले .
तिकिटासाठी म्हणून हातावर थोडे पैसे त्यांनी दिले.

कारभारणीला घेऊन संगे, बघा आता पळतो आहे.
उद्याच तिकीट काढतो आहे आणि बिहार गाठतो आहे.

हात ज़रा वर जाताच हसत हसत उठला.
अजुन नको मार मला एक प्रश्न मणी दाटला .
आपण सगळे भारतीय मग आमचा काय गुन्हा ?

मोडुन पडलाय आता संसार आणखी मोडू नका कणा.
म्हटलं, "मग सोडा युपी दिन,छट पूजा "
निकशुन सांगा तुमच्या नेत्याना
तुम्ही तिकडे यूपी अन बिहार मधे तुमची  *** घाला!!!!!!
इथे तुमचे काय काम नाय

अन जोर जोरात रोज
'जय महाराष्ट्र' म्हणा..!" फक्त 'जय महाराष्ट्र' म्हणा..!"
********************************************************

कालच तू पाठवलेली स्क्रिप्ट मिळाली

कालच तू पाठवलेली स्क्रिप्ट मिळाली,
अन सगळ्या ओळी सगळे संवाद.....सगळे शब्द ...
पुन्हा पुन्हा वाचले ....अधाशासारखे
काय लिहलय ? ते कळले....
पण का ते नाही कळत.
त्या दोन ओळीतल अंतर
तू जरा नको इतक जास्त सोडलय.
म्हणुन च जरा त्रास होतोय
मीनिंग बिटवीन द लाइन मधला समजायला .
मला माझा रोल कळलाय ..
अखेर पर्यंत स्टेज वर वावरन्याची संधी की शिक्षा ?
पण स्व:ताची मात्र लवकर एग्जिट .
सगळे संवाद सगळे शब्द... तोंडपाठ
प्रकाश योजना नेपत्थ बाकी सगळे काम जोरात चालले .
मला काय त्याच ?
उद्या तू भेटल्यावर अर्था सोबत तालीम सुरु होइल की ?
पहिल्या अन शेवटच्या प्रयोगाला सुरवात होइल ?
हाच प्रश्न मनात घोळतोय
पुन्हा पुन्हा एकच विचार मनात रुळतोय
मला कल्पनाच नव्हती इतके भन्नाट नाटक करशील तू
माझ्या एक सुन्दर कल्पनेच
********************************************************

आठवानीची पान चाळतांना

आठवानीची पान चाळतांना
तुझेही एक पान हाती लागते .....
अन मग मन वेड्या गत वागते .
भवीष्य समोर सोबत वतर्माना
तरी भुत्काळात ओढला जातो .
सार काही आठवते मग जे कधी वीसरायाच ठरवल होतं....
मन मग त्या सगळ्या ठीकाणी फीरून येत जीथं कधी आपल भेटणं होत ....
आन सर कही आठवत ...
डोळ्यात सगळ आभाळ साठवत ....
जागा होतो तो कोनान कोना,
.................................
..............................
ठाउक आहे आज तुझं येण शक्य नाही
तरी तुझ्या भेटी साठी आतुर होतो ,
का कसा कुणास ठाउक कसा कातर वेळेला फीतुर होतो .
तू गेलीस ज्या वाटेवर मला सोडून ...
तीचा शी तीजा पर्यंत मी शोध घेतो ..
ठाउक असत तुझ परत येन नाही ..
तरी मन तुझीच वाट बघत ...
रोज सूर्य मवालेपरयंत ते भटकत असते .
रात्र झाल्यावर तुझ्या आठव्नीत जागत ...
********************************************************
इंग्रज अजुन कुठे गेले
 
इंग्रज अजुन कुठे गेले,
कांग्रेसवाले त्यांचेच चेले,
इंग्रज गेले आणि येथे इंग्रजी वाले आले ,
आपला पंतप्रधान इथला आजही बुशला घाबरतो,
पडलेला नेता सगळे होम मिनस्टर डिपार्टमेंट चालवतो .
परदेशी बाई साठी जो वेगळी चुल मांडतो,
सत्ते साठी तो आज आपल्याशी लोंकाशी भांडतो,
खुर्ची साथी त्याला आता तीच वावड नाही,
आन शेती मंत्री क्रिकेट मधे गुंततो ,
काल पर्यंत भांडनारे नेते आता एक मोर्चा बनवतात ,
गरीब कार्यकर्ते मात्र रोज एकमेकांशी भांडतात.
आपलेच लोक आपले रक्त सांडतात.
त्या गांधी नोटेलाही सलाम
अन गाँधी टोपीलाही सलाम,
ख्रुची साठी मंत्री जाती आजकाल बदलतात
तिथि पक्ष आन नोटंच काय उदया शाक्य झाल्यास बापही बदलतील आपला
"१०० मेसे ८० बेम्मान
फिरभी मेरा देश महान " या वाक्याला आजही ताल्ल्या मिलातात
गरीब भिचारे तुरुंगात आन मत्री हॉस्पिटल मधे सजा भोगातात
१५ ऑग अन २६ जाने लोक सुठी मानून मोजतात .

 
********************************************************
काल पाउस कसा धोधो बरसला होता

का धरतीच्या मिलनाला तोही तरसला होता.
आभाळ भरल होत मेघानी ,
मलाही छळले होत त्या आठवणीनीच्या दिवसानी ,

कस सांगू तिला आता पाउस मला आवडत नाही.
तिची आठवनीच्या तावडीतून मला तोही सोडवत नाही.

काल कोसळनारा पाउस शेवटी एकटाच आपला बरसून थकला .
क्षणभर सोबतही माझ्या घरात बसला ,
विचारणार तो मला ती आज घरात नाही वाटत,?
इतक्यात तिची पावसात मोडलेली छत्री माझ्या हॉल जपलेली दिसली .
तोही आपला गप बसला थोड्या वेळांन हळूच म्हटला
" तिच्या सोबत भिजायची मजाच होती वेगळी."
तशी ती लाखातुन वेगळी होती .
कशी अन कधी तिची माझी सोबत सुटली?
पावसाला सांगू कसा? ह्याच प्रश्नात मी अडकलो होतो .
आज एकटाच त्याच्या तावडीत सापडलो होतो.
कंटाळुन मी सौमित्राचा लावला मग गारवा ,
पाउस कधी गेला कळलाच नाही
पुन्हा माझ्या अंगणात रुळलाच नाही .
रात्र झाली की मी दिवा लावलाच नाही ,
पाउस बाहेरचा आता थम्बत नाही .
आम्ही दोघही गाळतो टिप टिप .....तिच्या आठवणीत
तो मेघाची अन मी पापन्यतली ,
तशी ती दूर नाही गेली आहे इथेच काळजात.
ती रुसून बसली आहे आम्हा दोघावर,
तिने आपल घरच बांधुन घेतलय ढगांच्या वर ,
जिथे पाउस पडत नाही आणि कोणी रडत नाही.
********************************************************
खुप कही मला बोलायाचे आहे
खुप कही मला बोलायाचे आहे ,
पण आता मी बोलणार नाही .
काळजतले दु:ख कुणाला आता सांगणार नाही.
लोक इतके शहाने आजचे की ,
उद्या त्यावर माझा हक्क ठेवणार नाही.
मी गाइल माझे गाणे आज ज्यांचा समोर
उद्या तीच लोक माझे सुरांशी नाते ठेवणार नाही .

मी आता कोणाशी बोलणार नाही .
गुपीत तीचे नी माझे कोणाला सांगणार नाही.

डोळ्यात तीच्या पानी आता खुठे दाटूनयेणार नाही ?
ती दूर कुठे गेली इथेच माझ्या हृदयात ठान मांडून आहे .

मी बोलतो रोज तीच्याशी एकांत रात्री ,
चांदण्या असतात संगतीला .
रोज नवी आठवण आमच्या दोघांच्या पंगतीला,

मी आता काही बोलणार नाही
गुपीत आमचे आता खोलणार नाही

ती येते रोज रात्री मला भेटायला नदीच्या कीनारी,
गुपीत तीचे पाण्याला मी सांगणार नाही .

ती असते फुलांच्या सवे बागेत मज संगे
पन्भोवार्यना समोर मी तीला आता भेटणार नाही.

तीने घेतलेली शपत ती मोडून गेली
पण मी माझे वचन मोडणार नाही .
मनातले माझ्या मी ,मी कुणाला आता सांगणार नाही.

तीने दीलाय होकार मी मलाही सांगणार नाही.
लोक इथले इतके शहाने की त्यावरही गुपचुप बोलायची संधी सोडणार नाही.

काल परयंत ती होती फक्त माझी मैत्रीण ,
आज झाली जीवाची सखी हे गुपीत मी पाळ्नार आहे .

आजुन खुप तीच्या संगे बोलायाचे आहे .
पण आता बोलणार नाही .

डोळ्यांची भाषया मी तीच्या कडून शीकनार आहे .
दोघांचा करार कालचा मी पाळ्नार आहे .
********************************************************