Darshana Vijay Kumar ( मराठी / हिंदी कविता )

नमस्कार मी दर्शना विजय कुमार ,
जन्म मुंबईचा  कामानिमित्त कलकत्ता गाठले तेथेच स्थायिक झाले . कविता लिहिण्याचा छंद लहानपणापासून .

मी ...!

मी तुझे विश्व
मी तुझी संगिनी
तुझ्याच अंतरंगी
माझी झळके सावली .

मी तुझे आकाश

मी तुझी धरती
तुझ्याच ह्रदय-क्षितिजावर
माझी प्रित फुलली .

मी तुझे सौख्य

मी तुझी प्रेरणा
तुझ्याच मन-सागरी
माझ्या विचारांची भरती .

मी तुझे जीवन

मी तुझी प्रभा (प्रभा-प्रकाश)
तुझ्याच सुखापरी तेवती
माझ्या नयनांच्या ज्योती .
*******************************************
          
                  बरसेल पुन्हा पाऊस !
 
बरसेल पुन्हा पाऊस तुझ्या मनीचा...
प्रत्येक आठवण देईल सुगंध माझ्या प्रितीचा

आठवणींची जादुई झप्पी बेचैन करील तुझ्या मनाला
सुखद रेशीमगाठी गुंफत जातील प्रत्येक घडीला
 
क्षणोंक्षणीचा वाढत गेलेला तो दुरावा
जवळीक साधायचा प्रयन्त करील हर एक क्षणाला
 
चिंब ओल्या प्रेम सरींचा शिडकावा
तुझे मन हि तयार होईल त्यात भिजाया
 
अबोल अधरांच्या ह्या कळ्यांना
पुन्हा साथ दयावीशी वाटेल तुझ्या अधरांना
 
कळत नकळत जागवणारया हया आशेला
नव्याने अनुभऊ धुंद मिलनाच्या घडीला
 
तुझ्या माझ्या हया अनामिक नात्याला
सतत जोपासू मुक्यानेच ऋणानुबंधाला
 
बरसेल पुन्हा पाऊस तुझ्या मनीचा ...
प्रत्येक आठवण देईल सुगंध माझ्या प्रितीचा
 
*******************************************
मनोगत
जपलेले काही क्षण ...............
पुन्हा त्या क्षणांना,एक जादुई झप्पीची आस आहे.
गोड़ आठवणीनां ....................
पुन्हा निहारण्याची,एक नवीच बात आहे.
हळूवार तुझ्या मिठित................
ह्रदयाच्या स्पंदनांचा आभास हवा आहे.
रखरखित झालेल्या उष्ण मनाला,
तुझ्या शीतल स्पर्शाचा सहवास हवा आहे.
नयनांना माझ्या...................
तुझ्या चंचल नयनांची साथ हवी आहे.
वसंताच्या साक्षित सुकोमल अधरांवर,
तुझ्या अधरांची छाप हवी आहे.
जाणीवेच्या क्षितिजावर.................
दोन आत्म्यांच्या मिलनाचा भाग नवा आहे,
तुझ्या सोबतीचा प्रत्येक क्षण,
पुन्हा अनुभवण्याचा अट्टाहास नवा आहे
 
*******************************************
कृष्णा
मनतृषणेच्या काठावरती
चहूकडे म़ज तूच दिसशी ||
श्यामल रंग तुझा श्रीहरी
रंगुनी जाते,तुझ्यात मी अशी ||
मीठी मीठी तुझी बाँसुरी
मुग्ध होतसे,सारे प्राणी ||
चंचल चक्षुत तुझ्या माधवा
सारी सृष्टि,विरुनी जाती ||
गोड स्मिति त्या तुझ्या केशवा
मधु चा स्वाद हि फिका भासती ||
मथुरेत सुदामा नैन पसारे
वाट पाहसी मधुसुदनाची ||
नील यमुना डोहावरती
तुझीच छबी आकार घेतसी ||
कालिया तो, जणु देसी निमंत्रण
फणा उभारुनी लिले खातिर ||
नीलमणीचा मयूर पंख हा
मुकुट मुकुंदा शोभुनी दिसती ||
कान्हा कान्हा राधा करीती
आज हि वृदांवनी, स्वर गुंज गुंजती ||
 
*******************************************
रोशनी
रोशनी का एक दिया
यूँ ही जलाता रहे|
जुडनेवाली हर आस
मुमकिन होती रहें|
ख़यालों के तसव्वुर में
एक नया जहाँ बने|
बढ़नेवाले हर कदम को
नई दिशा मिलती रहें |
कठिन समय को आसाँ करें
हिम्मत वो बढ़ती रहें|
आसमाँ को छूने का
जुनून सिने में पलता रहें|
एकता की ताकद
यूँ ही बुलंद होती रहें|
बूरी नजरवाले
हमेशा रूसवाँ होते रहें|
ख्वाहिशें ऐसे ही नहीं
मुकम्मल होती हैं |
हजारों कोशिशों कि
डोर बाँधनी होती हैं|
आओ कुछ ऐसा ....
करें महफूज अपने वतन को|
आतंक का नाम मिटायें
वतन में लाये अमन को |
 
*******************************************
 
विरह म्हणे विरह......

विरह म्हणे विरह,किती किती हा विरह?
नको रे लाऊ जीवा हा रोग
हा रोग बरा नाही
त्यात गुंतणे चांगले नाही.
वेड लावतो हा मनीला
पुरताच भरकटतो हा जीवनाला.
क्षणा क्षणाच्या वेळेला
करतो खुप तासां एवढा.
असतो ह्याचा वार slow poison सारखा
करतो हा असर कर्करोगा सारखा.
विरह म्हणे विरह,किती किती हा विरह?
सोड ह्याचा नाद, कसा हा हट्ट???
उगा कोणासाठी का जाळावा हा जिव ?
किंमत अपुली कधी होईल तिला हि स्पष्ट.
करेल तिचा हि कुणी अपेक्षा असा भंग
दे फुट्टास ची गोळी दाखव अपुला रंग.
 
*******************************************
 
मैत्री तुझी न माझी

कोण जाणे कशी वाढत गेली.
रोज़च इंद्रधनुषी रंगानी,
भावनांचे विश्व विस्तारत गेली...
खरचं,मैत्री किती सुंदर असते.
हे सहवासाने तुझ्या मला भासवत गेले.
अशीच ही मैत्री अतुट रहावी म्हणुन,
सतत तीचे धागे मी गुंफत राहिले...
रोज़च तुला पाहण्याचा मला छंद जडू लागला.
मैत्रीच्या ह्या अतुट नात्याला मन ही प्रश्न विचारू लागला.
रोज़च तुझ्या संवादात काही शोधण्याची खुरापात होती.
पण भावनांना माझ्या दडवण्याचा एक विफल प्रयन्त ही होता...
खुपदा असं वाटत राहिल,किती ही मनाची उंच भरारी,
निष्पाप मनाला ही आहे, आस आकाश मिलनाची,
निरनिराळ्या हया छटांना सांभाळायचे होते... जपायचे होते....
पण अनामिक भितीने मन ही व्याकुळ होत होते....
कोण जाणे कशी..... मैत्री मागे पडत गेली...
नविन नविन नात्यांमध्ये रूपांतरित होत गेली.
आकर्षण,आस,मोह, माया,विश्वास,
रंग नवे नवे दाखवत गेली....
 
*******************************************
 
पाऊस

धुंद पावसामध्ये पुन्हा तू असेच यावे,
ध्यानी मनी नसताना प्रेम सरीत चिंब भिजवावे...
बेधुंद तुझ्या नजरेत प्रित फुलूनी यावी,
थेट काळजात माझ्या खोलवर रुतावी...
खट्याळ समीरा गत खोडी तुझी असावी,
थरथरत्या अधरांना साथ तुझ्या अधरांची मिळावी...
गोऱ्यापान गालास माझ्या गुलाबी रंगात यावी,
शराबी तुझ्या नयनात मधुची धुंदी भासावी...
तव साथीची आस आता युगा युगांची होती,
जन्म जन्माची ओळख मला हि पटली होती...
 
*******************************************
 
बरस रे मेघा बरस ...

लाले लाल जाहली काया
घामाच्या ओघळती धारा
चिंब भिजू दे उष्ण गरीमा
बरस रे मेघा बरस ....
पुन्हा मातीचा गंध घेऊ दे
मोराचा नव छंद घेऊ दे
थोडीशी म़ज मौज करू दे
बरस रे मेघा बरस ...
पुन्हा होऊ दे मी नवतरुणी
नाचू दे म़ज मुग्ध होऊनी
हलकेच छेडिल समीर हटूनी
बरस रे मेघा बरस...
धुऊन निघू दे रंग नको ते
ऊन-पावसा लपाछपीत हे
पुन्हा लेऊ दे इंद्रधनुष ते
बरस रे मेघा बरस...
 
*******************************************
 
Life में चुका...

Life में चुका आपण खुपदा करतो.
चुकांपासून शिकायचे ?
कि चुका करतच जगायचे...
चुका करण्यात काय मजा असते ?
नाही ती तर एक गोड सजा असते .
पण ही गोड सजा आपण वरंवार भोगतो.
जाणते उमजते चुका सतत करतो.
तरी त्या चुका दुरुस्त करत नसतो.
चुका करत जगण्यातच सुख शोधत असतो.
पण सुख शोधण्याच्या नादात फक्त दु:ख जगत असतो .
चुकांवर मात करावी असे दिमाग सतत बजावतो .
पण हट्टी मनासमोर त्याचा नेहमी पराजयच ठरतो.
विजयाच्या खुशीत तो फुलतच जातो.
पण फुलताना सुगंध मात्र क्षणिकच राहतो.
Life में full time त्यातच दंग राहतो.
पण part time सुखाला मात्र दूर वेशीवर टांगतो .
 
                     दर्द ...!
 
 तुम्हें भुला पाना आसान तो नहीं
यूं यादों को दफनाना मुश्किल है सही
 
फूलों सी खिलखिलाती सूरत तुम्हारी
हरगीज ना भूल पायेंगे इसे जिंदगी में कभी
 
हवाओं की छुवन भी याद दिलाएगी तुम्हारी
जिसमें भी बस होगी खुशबु, तुम्हारी ही तुम्हारी 
 
फ़िजा भी अपना रंग जब बिखरने लगेगी
बीते लम्हें अकसर याद दिलाने लगेगी
 
सागर की लहरें जब-जब किनारे को छुयेंगी
तुम्हारी बाहें बस हमें पुकारती दिखेंगी
 
आसमान में तारों की जब मेहफिल सजेगी
चाँद के रूप में तुम्हारी सूरत दिखती रहेगी
 
पल-पल तुम्हारी याद दिल जलाती रहेगी
जरें-जरें में तुम्हारी कसक मौजूद रहेगी
 
मज़बूरी इस दिल की समज पाओ जो तुम कभी
तब हर वफा हमारी दास्तान सुनाती  रहेगी
*******************************************
                       
                                     ख्वाहिश

आज दिल की एक ख्वाहिश पूरी कर दो मेरी तुम

लम्हे लम्हे की गुजारिश पर गौर कर लो जरा तुम

साजिश इन बूँदों की समझो जरा तुम

दिल की आरजू को परेशान कर दो जरा तुम

यू ना दूर-दूर रहो भीगे मौसम में हम से तुम

थोड़ी सिख ले लो इन मदभरी हवाओं से कुछ तुम

प्यार भरी इन आँखों से कुछ बातें कर लो, यू ही तुम

समेटकर इन पलों को दिल में छुपालो तुम

बाहों के इन घेरों को कस लो जरा तुम

लबों कि इस ख्वाहिश को ना अनदेखा करो तुम
आज दिल कि एक ख्वाहिश पूरी कर दो मेरी तुम
लम्हे लम्हे कि गुजारिश पर गौर कर लो जरा तुम.
 
*******************************************

 उलझन
ये कैसी है मिठी उलझन...
जिसको चाह्कर भी न मै सुलझा पाऊँ
भूलकर भी न भुला सकूँ
इतना मै तुमको चाहूँ
जिद है या दिवानापन ...
अपनी बात मै मनवाना चाहूँ
सच्ची लगन है तुम्हारी मै जानू
फिर भी इसे मै झूठलाती जाऊँ
प्रित डोर का हो ये बंधन ...
जिस में साथ तुम्हारा चाहूँ
रोम रोम अटल विश्वास मै पाऊँ
कभी न टूटे ऐसा बंधन चाहूँ
******************************************* 
जुदाई
बावरे इस मन को
आज भी में समझाऊ,
ना रोक इस वक्त को
समय कि धारा बदलनी है एक दिन |
छु कर इस मन को
क्या किया है तुमने जादू,
सब कुछ जानकर भी
अंजान बन बैठा है ये साधू |
मौसम यूं अब बदलने को है
पर्वतो पर घटा भी छाने को है,
कलियों के खिलने का समा बंध रहा है
प्यार कि खुशबु अब बिखरने को है |
पतझड़ का मौसम रुख बदलने लगा है
बारबाँ तुम्हारी याद आने लगी है,
कब तक इस तरह दूर बैठे अंजान रहोगे
रूबरू मुलाकात कि एक शाम तो दो |
अगर जो है तुम्हें हमसे सच्ची मुहब्बत
उसे निभा सकें ऐसा कोई सबब तो दो,
बिन शब्दों से कैसे हम समझे मन कि यह बात
यकीन आये हमें इस दिल पर ऐसा कोई यकीन तो दो |
 
*******************************************
मयखाना
खिंचता चला जाता हूँ मयखाने में
कि भूला दूँ मिठे दर्द का एहसास हर एक पैमाने में
हर एक शख्स को देखा बदलते हुवे
पर क्या बतलायें यार कि ये वैसे कि वैसी है...
बड़े अजीब है ये दर्द-ए-गम के रिश्तें भी
जलाते रहते हैं खून-ए-जिगर तील-ब-तील
चाहता हूँ कि जाम-ए-नशा कुछ ऐसा हो
जो ठहरा दे वक्त को इसी मुकाम पर...
दर्द-ए-गम भुलाना चाहता हूँ साकी में
कि हर जाम में मदहोशी का आलम हो
हर वक्त चूर रहूँ नशे में,
कि नासूर जख्मों का एहसास ना हो ...
 
*******************************************
  करीब
दिल के इतने करीब, तुम आते गए यूँ ही...
अकसर प्यार का एहसास,दिलाते गये यूँ ही |
जब आदत सी हो गई,हर पल तुम्हारी,
क्यूँ पास इतने आकर चले गये तुम ही |
वक्त के फासलों पर, अफसोस रहा हरपल...
पर हरदम हमने पाया,तुम्हे दिल के करीब ही |
तुम कहते रहे,हमसे मत उलझो इतना,
हम तो रेत हैं,हाथोंसे फिसल जानी है यूँ ही |
पर इस रेत कि भी कोई,फितरत तो देखें ...
जो होकर भी ना हो,क्या एहसास है ये भी ?
एहसास तो वो हो,जो शमा की तरह जल पाए,
हर लौ में दूसरों के लिये,दुवा शामिल हो पाए,
प्यार के नशे में,हर वक्त हम चूर ही सही...
तुम भी ना इससे अछूते रह पाओगे कभी |
नज़रों का ये धोका हैं ,समझो ना इसे यूँ ही ...
सच्ची लगन है मन की ,यक़ीनन जान पाओगे यही |
 
*******************************************
आखिर कब तक ?
 
चारों दिशाओं में छाया है आतंक का कहर
मन में है डर अब शामों शहर
थम से गए हैं कदम गोलियों की आवाज से,
आँखों में हैं खौफ,आखिर कब तक हम सहें?
रंगे हैं हाथ,अपनों ही के खून से,
गिला है चेहरा गम के आंसुओं से,
भर गए हैं कान अपनों की चीखों से
आखिर कब तक सुरक्षित रहेंगे,हम किस्मत की चादरों में?
शहीदों की याद आती है केवल विजय दिवस पे,
क्या सोचा है कभी कि हमारी खुशियाँ हैं उनके खून से रंगी,
क्या होता हमारा उन बहादुरों के बिन?
पर कब तक सहेंगे हम अपने कंधों पे उनके ये ऋण |
आखिर कब तक दबाएँगे हम अपनी आवाज ?
आखिर कब तक करेंगे हम अपनी जिम्मेदारियों को नजर अंदाज|
आखिर कब तक लगाएँगे हम सरकार पर इल्जाम |
कब तक? कब तक? ऐसे ही ढल जाएगी एक और शाम|
******************************************* 
जाने कब दुबारा मिल पाना हैं .....
 
हर एक एक दर्द में तेरा ही फ़साना हैं|
यादों को मुश्किल,यूँ भुला पाना हैं|
खयालों के तसव्वुर में,तू ही तू छाई हैं|
खो गया हूँ मैं खुद से ....
जाने कब दुबारा मिल पाना हैं|
विरान इश्क कि गलियाँ...
न जाने किन कदमों के,निशाँ ढूंड रही हैं|
पतझड़ के मौसम में भी,बहारों कि उम्मीद लगा बैठे हैं|
खो गया हूँ मैं खुद से ...
जाने कब दुबारा मिल पाना हैं|
तपिश इन आँखों कि,रूह में बस गई हैं|
बस एक नजर कि ख्याँहिश हैं,
इन में डुब जाना हैं|
खो गया हूँ मैं खुद से ...
जाने कब दुबारा मिल पाना हैं|
 
*******************************************
 
तू जवळ असलास ....

तू जवळ असलास कि मन कस मोहरून जात
निर्मळमनी झरयाच पाणी हि आपल्या आवाजात बोलू लागत
झुळ झुळत्या पाण्यात हि तुझ प्रतिबिंब प्रतीत होत
र्हिदयाच्या कप्प्यात तुझच अस्तित्व मजबूत होत जात ...
मनीच्या निळ्या आकाशात भरारी फक्त तूच मारतोस
र्हिदयाच्या निसर्गात इंद्रधनुष्य जसा तूच सजतोस
दृष्टीच्या पटलावर दूर पर्यंत तूच दिसतोस
र्हिदयाच्या कप्प्यात तुझच अस्तित्व मजबूत होत जात ...
मनातल्या गुलमोहराला बहर कसा तुझ्यानेच येतो
कुंकवाच्या टिपाला लाल रंग तुझ्यानेच भासतो
अंतरमनीच्या हिरवळीवर राज्य फक्त तुझच असत
र्हिदयाच्या कप्प्यात तुझच अस्तित्व मजबूत होत जात
 
*******************************************
 
खरंच प्रेम एक नशा आहे...

खरंच प्रेम एक नशा आहे...मधुशालेतल्या मधु सारख,
असतो आपण सगळ्यांबरोबर,तरी हि स्वप्नात असल्यासारख...
खरंच प्रेम एक नशा आहे... जगायच असत प्रेमात चंदनासारख,
स्व:ताला झिजवुन घेण्यासारख...
खरंच प्रेम एक नशा आहे...केवडयाच्या फुलासारख,
आपल्या मंद मंद सुगंधाने, सृष्टीला दरवळुन टाकण्यासारख...
खरंच प्रेम एक नशा आहे...सुर्याच्या सोनेरी किरणांसारख,
आपल्या सोनेरी किरणांनी, पृथ्वीवर प्रेमाचा वर्षाव करण्यासारख....
खरंच प्रेम एक नशा आहे...सागराच्या लाटांसारख,
आपल्या प्रत्येक लाटांनी, किनारयाला स्पर्श करण्यासारख...
खरंच प्रेम एक नशा आहे...निळ्या भोर नभात झेप घेण्यासारख,
आपल्या प्रत्येक झेपेमध्ये, स्वर्गाला हि गाठण्यासारख...
खरंच प्रेमात दशा होत नाही...
प्रेम तर एक नशा आहे,प्रेम तर एक नशा आहे...
 
*******************************************
 
सावित्रिचे मन

सावित्रिचे मन ही
कधी कधी भरकटायला लागत.
हव्या हव्याशा बंधनात असून ही
नव दिशा मन शोधायला लागत.
पण, मनावर कोणाच्या का काही ताबा असतो ?
शेवटी तो आपल्या वाटा शोधून काढायला तयार असतो ...
तिच्या ही मनक्षितिजावर
कोवळ्या कोमबांच्या पालव्या फुटू लागतात.
हलकेच मनात सुगंध सुमने
उमलायला जोर धरु लागतात.
पण,मनावर कोणाच्या का काही ताबा असतो ?
शेवटी दरवळनारया सुगंधात तो ही स्वत:ला पुरता हरवून बसतो ...
अनामिक बंधनात
गुरफटायला ती ही सज्ज होते .
तीचा ही मनमोर
पावसाच्या चाहुलीने नाचायला लागतो.
पण, मनावर का कोणाच्या काही ताबा असतो ?
शेवटी जगाची लाज सोडायला तो ही तयार असतो