गौरव देसाई

  माझी पहिली कविता

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सोबत

कुणाची तरी हवी असते
पण असे का घडते की जेव्हा ती

व्यक्ती हवी असते तेव्हाच ती आपल्या जवळ नसते
?

असे म्हणतात की प्रेम हे शोधून सापडत नसते
प्रेम हे नकळत होऊन जाते
मग तरीदेखील प्रत्येक व्यक्ती

प्रेमाच्या शोधात का असते
?

असे म्हणतात की प्रेमात पडल्यावर

सर्व काही सुंदर असते
तरीदेखील प्रेमात पडल्यावर

अश्रूंना का स्थान असते?

 

हे सर्व काही असले तरी

प्रेम हे अतिशय सुंदर असते
पण काही जणांना ते

शोधून ही सापडत नसते


   माझी मैत्रीण 

 

आहे माझी एक मैत्रीण खास
असतो जिचा विचार सदैव माझ्या मनात
रहात नसली जरी ती सारखी माझ्या आसपास
तरी जपून ठेवितो तिच्या स्मृती मी सदैव माझ्या हृदयात

आहे विलक्षण गोडवा तिच्या रुपात
जाणवून येईल मृदुलता तुम्हाला तिच्या बोलण्यात
अहंकाराचा लवलेश ही नसतो तिच्या वागण्यात
नेहमीच जपत असते निस्वार्थता ती आमच्या नात्यात

येउनी तिने माझ्या जीवनात
मारली आहे चैतन्याची एक नवी फुंकर
कोमेजुन गेलेल्या माझ्या या आयुष्यात
त्यामुळे बहरून आला आहे एक अमृतमय मोहर

गोड अशा माझ्या या मैत्रिणीबरोबर
वागा नेहमी आत्मियतेने
दुखवू नका कधी तिच्या मनाला
कारण तिला दुखवल्याची जाणीवच
करून देइल भविष्यात त्रास तुम्हाला

वाटलेच जर कधी तुला
आहेस एकटी तू या जीवनात
एक साद दे फक्त मला
कारण नेहमीच तत्पर असतील
कर माझे सावरायला तुला

 

 

  वाटते माझ्या मना

कधी कधी वाटते माझ्या मना
तू नसतीस तर काय अर्थ
राहिला असता जीवना
जेव्हा लाडात म्हणतेस मज तू साजणा
जगण्याचा मिळतो जणू एक नवा बहाणा

पाहूनी तुझ्या डोळ्यातील स्वप्नांची आर्तता
मनी विचार येतो कधी करू शकीन
मी त्या स्वप्नांची पुर्तता
देऊ शकत नसलो जरी आत्ता काही तुला
तरी वचन देतो सदैव तत्पर असिन मी तुझ्या साथीला

तुझ्या गालावर पडणारी खळी ती पाहून
हृदयात येतात आनंदाच्या लहरी दाटून
ओठांवर तुझ्या उमलनारे ते मंद हास्य
उलगडून देते जगण्याचे एक नवे रहस्य

नेहमीच आठवत असत मला
कठीणसमयी तुझ ते मला साथ देण
द्विधा मनस्थितीत सापडलेल्या मला
हळूवारपणे तुझ ते समजावण

कसे समजावू तुला
तुझे माझ्या आयुष्यात असलेले स्थान
तुझे माझ्या जीवनात येणे म्हणजे
परमेश्वराने मला दिलेले सर्वात मोठे वरदान
 

 

 तुझ्या येण्याची चाहूल

 

 

रम्य एका संध्याकाळी
वाळूवर बसलो असता
विचार आला मनी
सापडत का नाही मज
जगण्याचा योग्य रस्ता

मिळवलेल सर्व काही
आज मी गमावून बसलोय
माणसांनी गजबजलेल्या या जगात
स्वतःलाच हरवून बसलोय

कोण शोधून काढेल
हरवलेल्या मला या विश्वात
प्रत्येकजण तर दिसतोय इथे
मला स्वतःच्याच शोधात

शेवटी तुझ्या येण्याची चाहूल
लागली माझ्या मनाला
पण तू जवळ नसल्याची जाणीवच
पाझर फोडुन गेली अंत:करणाला
 

 

  माझ्या कवितेची उत्पत्ती

 

माझ्या भावना मी कागदावर मांडत असतो
कवितेच्या माध्यमातून त्या

तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो
करू नका थट्टा माझ्या भावनांची
त्यातूनच तर आहे किंमत माझ्या अस्तित्वाची

विचार तर नेहमी मनात खूप सारे येतात
पण ते लिहावेत कुठेतरी हे  नेमक येत नाही लक्षात
सांगायला तर माझ्याजवळ खूप काही असत
पण वेळप्रसंगी ते ऐकून घ्यायला

कुणीच जवळ नसत

अशा वेळी मी फ़क्त कवितेचाच आधार घेतो
तिच्यातच मग माझे सर्व विचार उतरवतो
ती देखील म्हणते मग "का रे सर्व काही मलाच सांगतोस
?"
त्यावर मग मी उत्तरतो

"वेडे तूच आहेस एकटी जिला मी या जगात आपलस मानतो"

 

  

    शीर्षक


आज मी कवितेच्या शीर्षकावरच
एक कविता करायची अस ठरवलय
कवितेच्या शीर्षकाची महती
माझ्या शब्दांतूनी मांडायच ठरवलय

शीर्षकावरुनच आपल्याला कवितेचा
सारांश कळत असतो
पूर्ण कवितेचा मतितार्थ कवी
त्या एकाच शब्दातून सांगतो


कवितेत असलेले शीर्षकाचे स्थान
आहे तरी केवढे
ते तर आहे संख्या लिहिताना
त्यात वापरलेल्या दशांशचिन्हाएवढे

शीर्षक देऊन कवी
आपल्या कवितेला पूर्ण करतो
मंदिर उभारणीनंतर जसा शेवटी
त्यावर एक सोनेरी कळस चढतो

शीर्षकावीण कविता
राहते नेहमी अधूरी
तीही बनून जाते मग
एक पंख छाटलेली परी

कवितेच्या शीर्षकाबद्दल मला
एवढच होत सांगायच
आत्ता तुम्हीच सांगा मित्रांनो
,
"
कवितेच्या शीर्षकावर लिहिलेल्या ह्या कवितेस मी नेमक शीर्षक तरी काय द्यायच
?"
        

  मनमंदिरातील देवा

 

आज मी माझ्या मनात

एक मंदिर उभारलय
त्यात देव म्हणून

फ़क्त तुलाच वसवलय
करणार नाही मी ह्या मंदिराच्या गाभार्यात

इतर कुणाची स्थापना
माझ्या प्रेमाची फूले वाहुनी करीन

तुझीच पूजाअर्चना
आरतीतूनी माझ्या

गाईन तुझे गुणगान
संरक्षणास तुझ्या लावीन

प्रणाला माझे प्राण
तुझ्यावरची माझी श्रद्धा

कधी होणार नाही कमी
भक्ती माझी अखंड राहिल

ह्याची देतो मी हमी
तुझ्याच आराधनेमध्ये देवा

मी माझे सर्वस्व वाहीन
माझ्या प्रेमाने तुजभोवतालच्या

दशदिशा उजळवीण
होणार नाही ह्या मंदिरात

प्रवेश इतर कुठल्या देवाचा
गरज भासल्यास प्राण त्यागून

देईन पुरावा माझ्या प्रेमाचा
वाटतय देवा आता तुझ्याकडे काहीतरी मागाव
तू नेहमी मला एकट्यालाच तुझा परमभक्त मानाव

 

 

तुझ्या येण्याने

 

खूप काही असुनही त्यावेळी
माझ्याजवळ काहीच नव्हत
पण तुझ्या येण्याने आज जणू
अख्ख जग मिळालय अस वाटत
एकते ते माझे मन असायचे
नेहमी खूप उदास अन खिन्न
आज तुझ्याच येण्याने साकारतय
माझ ते गोड स्वप्न
मैत्रिणी तर खूप होत्या पण
नव्हती कुणी जिवाभावाची सखी
तुझ्याच येण्याने लाभलाय आज
माझ्या जीवनरथाला प्रेमसारथी
दोघेही आपण झालो आहोत
आज एकट्यापासून दुकटे
एकमेकांच्या साथीने चल उभारू
आपल्या प्रेमाचे नवे घरटे

 

   कशी असतात ही माणस

 

मित्र मानतात पण
मित्रत्व कधी जपत
नाहीत
आपुलकी दाखवतात
पण
आपलस कधी करत
नाहीत
जवळ करतात
पण
जवळीक कधी साधत
नाहीत
गोडीने वागतात
पण
नात्यात गोडवा आणू शकत
नाहीत
धीर देतात
पण
संकटांना धैर्याने सामोरे जाऊ शकत
नाहीत
खुशामत करतात
पण
इतरांना खुश कधी बघवू शकत
नाहीत
व्यक्तीमत्व घडवतात
पण
एक चांगली व्यक्ती बनू शकत
नाहीत
इच्छा व्यक्त करतात
पण
इच्छापूर्ती मात्र करू शकत
नाहीत
हसू शकतात
पण
कुणाला हास्य देऊ शकत
नाहीत
त्यातूनही वाईट
म्हणजे
प्रेम करतात
पण
प्रेम निभावू शकत
नाहीत.
 

 धरणीमाय 

 

आकाशाची उंची तर सर्वच जण मापतात
पण धरणीमायेची खोली किती जण हो
मोजतात?
असे म्हणतात आकाशातून बरसलेल्या धारांनी सर्वत्र चैतन्य पसरते
पण धरणीमायेने पिकविलेल्या दाण्यांनीच ना हो पोटाची भूक
शमते?
ह्यावर तुम्ही म्हणाल, दाणे पिकविण्यासाठी धरणीमायेला
असते गरज आकाशातून बरसणार्या
पावसाची
पण मलाच सांगा, मेघनिर्मितीसाठी
आकाशाला
नसते का गरज धरणीमायेवरील
सागराची?
आकाश तर केवळ पक्ष्यांचाच भार झेलते
पण धरणीमाय मात्र सजीव-निर्जीव सर्वांनाच आपलस
करते
आकाश तर केवळ छत्र देण्याचे काम
करते
पण धरणीमायच आहे ना जी आपल्या सर्वांचा भार
सांभाळते.
आकाशात तर केवळ वीजांचाच कडकडाट होत असतो
पण धरणीमायेला मात्र वृक्षहानी, भूकंप

ह्या सर्वांचाच त्रास सहन करावा लागतो
माणसाला तर नेहमी आकाशातील

चंद्र-तार्यांची सुंदरताच दिसत असते
पण दिनभर सूर्यप्रकाशाचे चटके सोसणार्या

धरणीमायेची पीडा कधी त्याला कळते
हे सर्व सांगून मला आकाशाला तुच्छ नव्हत
लेखायच
पण धरणीमायेसमोर त्याच असलेल स्थान

मात्र नक्कीच होत दाखवायच
 

 साद

 

जीवनाच्या रस्त्यावरून चालताना

एक साद कानी पडली
सादेनेच मग त्या पावले जागच्या जागी
थबकली
वळून पाहिले मागे तर कुणी दिसलेच
नाही
वेळेनीही दिली होती त्यावेळी

माझ्या अस्थिर मनाची ग्वाही
प्रवासास निघताना सोबत कुणाची तरी

मिळेल अशी केलेली अपेक्षा
आयुष्यात देखील वेळोवेळी पदरी

पडली होती केवळ निराशा
पुढे चालावे की मागे जावे

हे नव्हते त्यावेळी कळत
भविष्य घडवावे की भूत सुधारावे

या विचाराने होते मन गोंधळत
विचाराअंती कळले की,प्रवासातील

काही स्थळांचा विसरलोय घ्यायला लोभ
गतकाळातील चुकांवरून मला

घेताच नाही आलाय काही बोध
पुढे जाव म्हंटल तर समोर दिसतायत

खुप सार्या वाटा
भविष्य घडवायच ठरवल तर जाणवतोय

अनुभवांचा अपुरा साठा
संभ्रमात पडलेल्या माझ्या मदतीला

शेवटी ती सादच धावून आली
भूत-भविष्याचा विचार सोडून वर्तमान घडव अस सांगुन
गेली.
आता तुम्हाला विचार पडला असेल

की मला ऐकू आलेली साद नेमकी असेल तरी कुणाची??
ती तर मला झालेली जाणीव होती माझ्या कर्ताव्यांप्रतीची
 

 तुझ्यावर केलेली कविता


नेहमी म्हणत असतेस ना
माझ्यावर एक कविता
कर
पण तुझ्यावर कविता
करायची
म्हणजे शब्द नाही
पुरत
चेहरा तुझा डोळ्यासमोर
येताच
"
नेमक काय करतोय
मी"
हेच नाही आठवत
आज खूप
प्रयत्नांनंतर
तुझ्यावर एक कविता
केलेय
चित्र तुझे इथे
मी
शब्दात
रंगवलेय
सुंदरतेला तुझ्या
तर
नाहीच काही
तोड़
रुपालाही मिळालेय
इथे
निर्मळ मनाची
जोड़
तू म्हणजे माझ्या
जीवनात
घडून आलेला एक
साक्षात्कार
वादळात अडकलेल्या
खलाशाला
मिळालेला खंबीर
आधार
तुझ माझ्या जीवनात
येणं
मैत्रीण म्हणून हृदयात घर
करण
म्हणजे जणू पावसाच्या
एका
थेंबासाठी तरसलेल्या
धरतीला
श्रावणधारेने येउन तृप्त
करण
तुझ्याबरोबर
असताना
विसर पडतो संपूर्ण
जगाचा
असुनही नसतो
त्यावेळी
मी माझ्या स्वत:
चा
वाटतय
तुझ्यावर
अजुन खूप सार
लिहू
"
पण कवितेची नजर लागली
तर?"
ह्या विचाराने मन लागलय घाबरू.

   

 

 मन मनातल्या मनात रडले  

 

त्यादिवशी एक विपरीतच घडले
कधी नव्हे ते माझे मन
रडले
विचारताच मी काय
रे
"
हा काय प्रकार
होता?"
म्हणाले ऐक आज
माझ्या दुखांची
गाथा
सगळ्यांचा तुला
येतो
भारी
पुळका
पण दिसत नाही
कधी
माझा चेहरा
रडका
सर्वांच्या दुखात
होतोस
नेहमी
सामील
पण होते का
कधी
माझ्या यातनांची
जाणीव?
सर्वांना सहाय्य करण्या
असतोस नेहमी
धावत
पण तू रडतोस
तेव्हा
माझ्याशिवाय असते
का
कुणाची
सोबत?
स्वतः बरोबर इतरांच्याही
दुखांचा टाकतोस माझ्यावर
भार
पण मी
रडताना
घ्यावा कुणाचा
आधार
मनाची ती
शोकांतिका
ऐकून मलाही वाईट
वाटले
आणी कळून आले
की
आज आपले
मन
मनातल्या मनात
रडलेय

 

 मीच माझा जोडीदार बनतो

 

कधीकधी 'मीच' माझा जोडीदार बनतो.
'
मीच' माझा एकटेपणा दूर करू पाहतो
आरशात स्वतःला पाहून '
मीच'
माझ्या रुपाची प्रशंसा करतो
त्यावेळीही 'मीच' माझ्यावर खुश होत
असतो
आनंदाची बातमी 'मीच' मला धावत येऊन
देतो
निराश होताच 'मीच' माझे सांत्वन करू
पाहतो
फिरायला जायला 'मीच' माझ्या बरोबर
निघतो
त्यावेळीही 'मीच' माझा हात पकडून चालत
असतो
लाडात येउन कधीकधी 'मीच'
माझ्या
गालांवरून हात
फिरवतो
अश्रु आले तर 'मीच' माझ्या हातांनी ते
पुसतो
मावळत्या सुर्याला पाहण्यास '
मीच'
मला घेऊन जातो
वाहत्या लाटांचा स्पर्श '
मीच'
माझ्यासंगे अनुभवतो
वाळूचा किल्ला बांधायला '
मीच'
मला मदत करतो
तो तुटून पड़ता मग '
मीच'
माझ्यावर खोट खोट रागावतो
घरी परतायला मग '
मीच'
माझ्याबरोबर निघतो
"
उदया पुन्हा तुला इथे घेउन येईन"
असे
त्यावेळी 'मीच' मला
सांगतो
रात्री झोपताना मग 'मीच' मनाची
समजूत
काढण्याचा प्रयत्न करत
असतो
पण तेव्हाही माझ्यासंगे केवळ '
मीच'
रडत असतो


वाटत माझ्यावरही कुणी प्रेम कराव

 

वाटत माझ्यावरही कुणी प्रेम कराव
माझ्या फोनची दिवसभर वाट पहात
बसाव
फ़ोन मी करताच सुरुवातीला तिने थोड
लाजाव
पण नंतर मात्र मनातील सर्व काही
सांगाव
स्वतःहून तिने भेटायच
ठरवाव
माझ्या आधीच ठरल्या जागी
पोहचाव
उशीर मज होताच तिच्या नजरेने मला
शोधाव
'
अजून का आला नाही' ह्या विचाराने मन तीच
गोंधळाव
नजरेस मी पडताच मात्र गाल फुगवून तिने
रुसाव
कितीही विनवण्या केल्या तरीही मग तिने
मानाव
निराश होताच मग मी गालातल्या गालात थोड
हसाव
त्यावेळी मग मी ही थोड खोट-खोट
रागवाव
माझ्या गालांवरून हात फिरवत तिनेही
मग
"
रागावू नकोस ना रे" अस
म्हणाव
माझ्या खोट्या रागाला तिने क्षणात दूर
कराव
बोलता बोलता तिने हळूच खांद्यावर डोक
ठेवाव
हातात हात घेऊन माझ्या बोटांशी खेळत
रहाव
विनोद मी करताच तिने मनसोक्त
हसाव
चुकीचे काही बोलताच मात्र खूप
भडकाव
हताश मी असता पाठीवरून

हात फिरवत मज समजवावे
आनंदी मी असता जवळ येउन

हळूच गालावर एक चुंबन द्यावे
घरी जायला निघताना मन तिचे उदास
व्हावे
तिच्याही डोळ्यात अश्रुंनी दाटून
यावे
घरी परतताच तिच्याच आठवणींनी मन व्याकूळ
व्हावे
स्वप्नातही रात्री तिचेच रूप
दिसावे
खरच वाटत कुणीतरी माझ्यावर प्रेम
करावे
स्वतः इतकच मलाही तिने
जपावे